तुकोबारायांची गाथा समाजासाठी दिशादर्शक -प्रा. रवींद्र बनसोड
(09-05-2010 : 2:37:36)
वाळूजमहानगर, दि.८ (लोकमत ब्युरो)- तुकोबारायांची गाथा आजही समाजाला दिशादर्शक असून, त्याचे वाचन करून आचरण करावे, असे प्रतिपादन प्रा. रवींद्र बनसोड यांनी केले. बजाजनगरात राजे छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफताना बनसोड बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य आर.एस. पवार यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून विग कंमाडर टी.आर. जाधव, बी.जी. गायकवाड आदींची उपस्थिती होती. विदेशात ज्ञानाला देव मानले जाते; परंतु आजही आपल्या देशात दगडाला देव मानतात. अंधश्रद्धेच्या अधीन जाऊन आजही आपला समाज विकासापासून कोसोदूर आहे. विज्ञानापेक्षा दगडाला जास्त महत्त्व दिले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तुकोबारायांना १७व्या शतकात विज्ञान समजले होते. त्यांनी अंधश्रद्धेला थारा न देता विज्ञानवादी दृष्टिकोन दिला आहे. अशी अनेक उदाहरणे देत प्रा. बनसोड यांनी आपल्या व्याख्यानातून सखोल मार्गदर्शन केले. प्रतीक्षा तोडमल हिने पोवाडा सादर करून उपस्थितांची मने जिकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाळूजमहानगर अध्यक्ष लिबराज सोमवंशी यांनी केले, तर सुदाम कदम यांनी आभार मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी एन.बी. दळवी, आत्माराम शिदे, नंदकिशोर ढोबळे, लताताई गावंडे, सोनाली सोमवंशी, आनंद सुरवाडे आदींनी परिश्रम घेतले.
Subscribe to:
Posts (Atom)